Showing posts with label रघुनाथ बल्लाळला दंडा. Show all posts
Showing posts with label रघुनाथ बल्लाळला दंडा. Show all posts

Tuesday, December 1, 2015

रघुनाथ बल्लाळला दंडा



शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ )
सांभार : http://www.marathaempire.in/
भाग १४५

शिवाजी राजे दंडा-राजापुरी जिंकतात
जावळी घेतल्यानंतर शिवरायांना थेट कोकणाला हात घालता येत होता. जंजीऱ्याचा सिद्दी आता त्याचा शेजारी झाला होता. १३ ऑगस्ट १६५७ ला शिवरायांनी रघुनाथ बल्लाळला दंडा राजापुरीवर धाडले. ह्या घटनेचा उल्लेख शिवापूर शकावली देते. रघुनाथने ह्या मोहिमेसाठी पाच सहा हजार घोडदळ घेतले होते असे त्यातून कळते.
रघुनाथने आधी तळे-घोसाळे हे दोन किल्ले व त्यांचा परिसर जिंकला. एक दोन ठिकाणी त्याने सिद्दीच्या सैन्याला पळवून लावले. त्यानंतर त्यांच्यात तह झाला. शिवभारतातही ह्या घटनेची पुष्टी मिळते. अफजलखानने सन १६५९ मधे वाईला पोहोचल्यावर लिहीलेल्या पत्रातही ह्याचा उल्लेख आहे. शिवरायांनी सिद्दीच्या प्रदेशात केलेले आक्रमण थांबवून ते भाग सिद्दीला परत देण्याची आज्ञा त्यात केली आहे.
सिद्दीला जंजीऱ्यावरून हुसकावून लावायला त्यावेळी मराठ्यांकडे नावीक बळ नव्हते. त्यामुळे रघुनाथ बल्लाळने फक्त दंडा-राजापुरीचा भाग जिंकून घेतला.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८५४-८५५
Website Security Test