Sunday, August 19, 2012

mother of shivaji maharaj

 Jijau masaheb


Birth date and family life

Jijabai was born on 12 January 1598 and a daughter of Lakhoji Jadhav in present-day Buldhana district of Maharashtra State. As per the customs of that age, she was wed at an early age to Shahaji Bhosale, a nobleman and military commander under the Adil Shahi sultans of Bijapur in present-day Karnataka. She was his first wife.
Jijabai gave birth to eight children, six daughters and two sons. Of these only the two sons, Sambhaji and Shivaji, survived while the rest died in infancy.

On mission

She wholeheartedly supported her husband's cause. Shahaji had tried to establish a Hindu state on the ruins of the erstwhile Nizamshahi sultanate. However he was defeated by the combined forces of the Mughals and Adilshahi. Shahaji became a sardar in Adilshaha's army. He settled in Karnataka and got married again. As per the treaty he was forced to move south. In order to continue the struggle, he deputed her as queen regent.

The elder son Sambhaji remained with their father. Shivaji left Bangalore along with his mother, a council of ministers and chosen military commanders. When they arrived in Pune it was full of jungles and wild beasts.She encouraged cuiltivators to settle. She renovated the kasaba ganapati temple. A Red sandstone palace of moderate size known as lal mahal was also built. She has given a number of decisions in legal and administrative matter known as majhars.
Jijau was a very pious and intelligent woman with great vision for independent kingdom. She inspired Shivaji Maharaj by telling stories from Ramayan, Mahabharat,Balaraja. Inspired by her, Shivaji Maharaj took Oath of Independence (SWARAJYA)[1] in fort temple of lord Raireshwar in 1645 when he was 17.In Shivaji,s impeccable, spotless character and courage Jijabai,s contribution is enormous.
Jijau's elder son Sambhaji was killed while on a military expedition in Karnataka by Afzal Khan. When Shahaji died, Jijabai tried to commit sati - committing suicide by burning oneself in the husband's pyre, but Shivaji stopped her from doing so by his request. Jijabai is widely credited with raising Shivaji in a manner that led to his future greatness. She died soon after coronation of Shivaji.

Death

Jijabai died on 17 June 1674. Shivaji was heart-broken during her death. Sivaji was not able to resist jijabai's death and went under great distress after this incident.

Thursday, August 9, 2012

संभाजी राजे जीवन परिचय

*सईबाई निंबाळकर आणि शिवाजी  महाराज यांचा विवाह-१६ मे १६४०
*जन्म-१४ मे १६५७ 
*किल्ले- पुरंदर
*आई-मातोश्री सईबाई निंबाळकर
*५ सप्टेंबर-सईबाई यांच निधन
*३० मार्च १६६५ मिर्झाराजे जयसिंग यांचा पुरंदरला  वेढा .
*११ जून १६६५ संभाजी राजे यांना पंच हजारी मनसबदारी
*१८ जून १६६५ पुरंदरच्या तहानुसार उग्रसेन कछवाह  यांचे बरोबर जयसिंग यांच्या छावणीत दाखल
*५ मार्च १६६५ शिवाजी महाराज सोबत आग्रास प्रयाण
*११ मे १६६६ आग्रा येथे पोहचले
*१७ ऑगस्ट १६६६-शिवाजी राजांसोबत आग्रा येथून ऐतिहासिक सुटका
*१२ सप्टेंबर १६६६-शिवाजी महाराज रायगडावर परतले
*२० नोव्हेंबर १६६६ -साम्भाजे राजे सुखरूप रायगडावर पोहचले
*शिवाजी महाराजांचा मोघालांशी शांतता करार त्यानुसार संभाजी महाराजांना ४००० हजारी मनसब
*९ ऑक्टोबर१६६७ -रोजी औरंगाबादला प्रयाण २७ ऑक्टोबर१६६७ पोहचले

Friday, August 3, 2012

वाघाच्या जबड्यात घालुनी हात...


वाघाच्या जबड्यात घालुनी हात...

वाघाच्या जबड्यात घालुनी हात
मोजिते दात जात ही आमुची
पहा चाळुनी पाने पाने
आमुच्या इतिहासाची

पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमुची
तुम्हा काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशीची
दाभाड्याची उमा ती लढली चन्नमा चित्तुरची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची


जिवंत वीर तर लढले लढले नवल ते काय घडले
धडवेगळे शिर झाल्यावर धड ते अवघे लढले
मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

वंशज आम्ही रामकृष्ण अन् गुरु गोविंदसिंगाचे
तसेच आमुच्या शिवबाचे अन् प्रताप रणा याचे
आम्हा बरोबर लढण्या नसेल व्यली माय कुणाची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

दुष्ट हेतुने आल जरी तू गिळण्या हिंदुस्थान
तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्थान
दुष्ट शत्रुचे मढे गाडण्या जमीन पुरते आमुची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

शिवरायांचा पाळणा




शिवरायांचा पाळणा

गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया
अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||

हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||
निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||

चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका

का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ ||
ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ ||
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली ||
ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान

हे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ ||

- राम गणेश गडकरी ’गोविंदाग्रज’

मराठी पाऊल पडते पुढे...


                                                                मराठी पाऊल पडते पुढे...
खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठिला
भला देखे.

स्वराज्य तोरण...
स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे
मराठी पाऊल पडते पुढे llधृll

मायभवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा आज दिवाळी
चला सयांनो, अंगणी घालू
कुंकुमकेशर सडे,
मराठी पाऊल पडते पुढे,
मराठी पाऊल पडते पुढे. ll१ll

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही,
नसांतुनि सळसळे,
मराठी पाऊल पडते पुढे
मराठी पाऊल पडते पुढे ll२ll

स्वयें शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपुला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
शुभघडीला शुभमुहूर्ती...

जय भवानी.... जय भवानी...
जय भवानी, जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी,
जय भवानी....

जयजयकारे दुमदुमवू हे सह्याद्रीचे कडे....


गायक: लता, आशा, उषा, हृदयनाथ, हेमंतकुमार
संगीतकार: आनंदघन
चित्रपट: मराठा तितुका मेळवावा.

शिवकल्याणराजा

शिवकल्याणराजा

निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥

आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥

या भूमंडळचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥


रचना - समर्थ रामदास

शिव-प्रताप...




शिव-प्रताप...

घेऊनी ती सहस्त्र सेना, विजापूरचा यवन निघाला
स्वत:च पूसुनि सौभाग्याला, काळ मिळे या महाभागाला..

दीन दीन ची सेना आली, घोषाने त्या धरणी कापली
घाव तो पहिला मातेवरती, गायही कापली तिच्याच पुढती

अत्याचार ते अघोर केले, देवहि नाही त्याने सोडले
बुत्शकिनच नाव तयाचे, कायमचे ते बूत राहीले

म्हणे 'कुठे पळाला अजान चुहा, पकडण्यास आला बागुल-बुआ'
बाहेर काढा त्या सिवला, शीर हवे मज बेगमेस दियाला....

**इकडे शिवाजी महाराज आणि सगळे मावळे अफजल खानाच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते
**पंत अफजल खानाला भेटले त्याला हवी ती वचने दिली आणि प्रतापगाडाच्या पायथ्याला भेट पक्की झाली

सापडेल ती 'ऊ' ही एकदा, हिडिंबेच्याही केसामधली
हत्ती न सापडे कितीही शोधता, जावळ खोर्‍याचीही महती,

दीसही ठरला, जागा ठरली, बसल्या मुहूर्त मेढा
शामीयाना तो खुबच नटला, त्याला शिव-शहीचा वेढा

अगडबंब त्या देहापूढती ठाकला, युक्तित्वाच ठेला,
मनात वंदुनी जगत् मातेला, कवेत नृसिंह धावला

कोतळ्यात खंजीर खुपसला, पोट फाडले अन्यायाचे
प्रसन्न झाली दुर्गा माता, राज्य आपूल्या शिवरायांचे..

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

 

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि- नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगले
परदास्य-पराभविं सारीं । मंगले
या जगति जगूं ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या
                                             हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा                                                                

- स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

शिवरायांची आरती

जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला आला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
... करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२

त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला देशस्वातंत्र्या चा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप्की जय बोला..........४

Website Security Test