Saturday, December 21, 2013

हिच ती जागा जिथे


हिच ती जागा जिथे ओशाळला मृत्यू ……


तुळापुर ला गेल्यावर तिथे भिमा-भामा-इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावरून नावे ने पलीकडील तीरावर जाता येते.
नदी पार केल्यावर समोरच्या झाडी झुडपातून वाट काढत पुढे गेल्यावर हे बांधकाम नजरेस पडते. ह्याच ठिकाणी क्रूर औरंग्याने शंभू राजांना साखळ दंडानी बांधून ठेवले होते. याच ठिकाणी त्यांच्यावर अमानुष अत्त्याचार करण्यात आले. इथेच होती त्या औरंगजेबाची छावणी.
आणि ह्याच भूमीवर रक्ताभिषेक घातला माझ्या राजानं …. हीच ती भूमी आणि इथलीच झाडे झुडपे ज्यांनी पाहिले माझ्या राजाचे बलिदान…
याच ठिकाणी शंभूराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीभोवती टाकले होते. रात्री येथील गावकऱ्यांनी ते जमा करून तुळापुर आणि वढू येथे गुपचूप पणे त्या तुकड्यांना अग्नी दिला होता.
काही वर्षांपूर्वी तिथे शंकराचे मंदिर बांधावे या हेतूने काही जणांनी शंकराची पिंड आणि नंदी ची स्थापना केली होती परंतु काही कर्म दरीद्र्यांनी त्याची हि नासधूस केली. बाजूलाच पडलेली नंदी ची मूर्ती याची साक्ष अजूनही देत आहे.
(तुळापुर - आळंदी गावातून तुळापुर १० किमी वर आहे)

साभार - अमोल तावरे

No comments:

Post a Comment

Website Security Test