Showing posts with label हिरोजी फर्जंद. Show all posts
Showing posts with label हिरोजी फर्जंद. Show all posts

Sunday, April 28, 2013

हिरोजी फर्जंद


लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजेल ह्या काळजीमुळे प्रत्येक रयत रयतेतील प्रत्येक जण महाराजांवर जीव ओवाळून टाकीत होता त्यातीलच एक म्हणजे हिरोजी फर्जंद

मिर्झा राजे जयसिंग यांबरोबर झालेल्या कराराच्या ओझ्यामुळे महाराजांना पातशहाच्या भेटीसाठी आग्र्यास जाणे भाग पडले औरंगजेबाचा पन्नासाव्या वाढदिवसाला महाराज त्या औरंग्याच्या दरबारात हजर होते येथे मात्र महाराजांचा अपमान करण्यात आला आणी नंतर महाराजांना डांबून ठेवण्यात आले हफ्सी मुराज खान, फौलाद्खन जातीने पहारा देत. नंतर हे पहारे ढील्ले पढले

युक्ती लढवली गेली तसेच झाले. महाराज दि. १७ ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वतः हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत पांघरून घेऊन झोपला झोपला.

(मागें दिल्लीमध्ये हिरोजी फरजंद पलंगावरी निजला होता. तो चार प्रहर रात्र व तीन प्रहर दिवस तैसाच निजला.चौकीचे पोलादखानाचे लोक कोठडीत येऊन पाहतात {तो} राजे शेला पांघरून निजले.पोर पाय रगडित होता. पोरास लोक पुसतात की राजे आज फार वेळ निजले? पोर म्हणतो की 'शीर दुखते'ऐसे पाहोन लोक जातात. तैसाच तीन प्रहर रोज हिरोजी निजला होता. तों प्रहर दिवस असतां हिरोजी उठोन , आपलीं पांघरुणे, चोळणा, मुंडासे घालून पोर बरोबरी घेऊन, बाहेर आला चौकीदारांनी पुसिले त्यांस हिरोजीने सांगितले की शीर दुखते, कोणी कोठडीत जाऊ लागेल त्यास मन करणे. आपण औषध घेऊन येतो " म्हणून चौकीदारास सांगून दोघे बाहेर गेले. रामसिंगाचे गोटास जाऊन त्यास एकांती वर्तमान सांगोन आपण तेथून निघोन देशाचा मार्ग धरीला ) कंसातील लेखन - सभासदाची बखर



दुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला.एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूत चिटपाखरूही दिसले नाही. पलंगावर एक गाठोडे , एक लोड आणि दोन जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले. ते पाहून फुलादखानाची काय अवस्था झाली असेल ? तो विरघळला की गोठला ? त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का ? आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का ? केवढी फजिती!

एवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर तो सीवा आपली थट्टा करून पसार झाला तेही साऱ्या मावळ्यांना सुरक्षित घेऊन . आता त्या औरंगजेबापुढे जायचे तरी कसे ? त्याला सांगायचे तरी काय ? काय अवस्था झाली असेल फुलादखानची ?

केवढी ही स्वामीनिष्ठा केवढा हा त्याग स्वताच्या जीवावर खेळून पर मुलखातुन आपल्या धन्याला सुखरूप राजगडी न्हेणारे असे हे हिरोजी फर्जंद
Website Security Test