Saturday, February 25, 2012

पोवाडे

प्रतापगडाची झुंज (पोवाडा) –शाहीर विष्णुपंत कर्डक

प्रतापगडाची झुंज
चौक १
धन्य--धन्य शिवाजी भोसला । वीर गाजला ।
राजा शोभला । राष्ट्राला पूर्ण देऊन आधार ।
यवन सत्तेस झुगारुन पार । राज्य मराठयांचे केला विस्तार ॥
विजापुरी भरला दरबार । शिवाजी बंडखोर ।
झाला शिरजोर । वेडी बेगम म्हणे हो सरदार ।
सांगा शिवाजीला कोण धरणार । तयाला बढती थोर मिळणार ॥
पैजेचा मांडिला विडा । करीना कोणी धडा ।
झाला मग खडा । क्रोधान अफझूलखान ।
मराठा शिवाजी सैतान । कायमचा टाकतो मी गाडून ।
पैजेचा विडा उचलून । दरबारी बोलला गर्जून ।
शिवाजीचं मुंडक कापून । विजापूरी येतो घेऊन ।
असं म्हणून शिवाजीवर खान चालला ॥
खेडीच्या-खेडी उध्वस्त करु लागला ।
एक लाख फौज संगतीला । जाळपोळ करीत चालला ।
कापितो गाय रस्त्याला । देवांच्या फोडतो मूर्तीला ॥
जमीनदोस्त करा देवळाला । जुलमाने छळी हिंदुला ।
तुळजापुरी येताच चालून । जात्यात घालून ।
टाकली भरडून भवानी देवीला ॥ पंढरपुरी येताच खान ।
शिरला राऊळात । चक्रीत झाला पाहून नाही देव देवळात ॥
भिऊन पळाला म्हणे मला हा शिवाजीचा देव ॥
शिवाजीची काय कथा, आता मी घेतो त्याचा जीव ॥
क्रोधानं फोडून मग देऊळ । निघून चालला ॥
तळ देऊन येऊन राहिला । वाई गावाला ॥
शिवाजीला निरोप धाडला । तू यावं शरण खानाला ।
ऐकशील जरी या वेळा । तरी देतो जीवदानाला ।
ना तरी मराठा मुलखाला । तुज सहित मिळवीन मातीला ।
असं सांगून शिवाजीकडे । कृष्णाजी भास्कर वकील धाडला ॥
शिवाजीला आधीच देवांचा अर्ज होता गेला ॥
दुर्दशा करुन खानानं छळलं आम्हाला ॥
शिवाजीनं समय पाहून । केलं मान्य खान बोलणं ।
मग तह ठरला मिळून । सडया स्वारीनिशी येऊन ।
एक वीर संगती घेऊन । भेटावं बहु आनंदानं ।
असा बेत नक्की ठरवून । करार करुन । वकील परतला ॥
शिवाजीनें केली तय्यारी पहा त्या वेळा ।
गुढया-तोरणे उभारुन प्रतापगड सजवीला ॥
थोर शोभा केली मंडपाला । पाचूचे मणी खांबाला ।
हिरे माणके मध्य भागाला । गाद्या-गिरद्या तक्कया लोडाला ।
मयूर सिंहासन बसण्याला । इंद्रपुरी जणु वसविली प्रतापगडाला ॥
आघाडीस ठेवला नेताजी । पिछाडीस बाजी । मध्ये तानाजी ।
मराठा फौज बंदोबस्तास । शिवाजी भेट देईल खानास ।
वृत्तांत ऐका पुढील चौकास ॥
चौक २
आहा आहा शिवाजी भोसला । शरण आपणाला ।
कळता यवनाला । हर्षला अफझूलखान ।
बोलू लागला तो गर्वानं । शिवाजीला ठोशात मारिन ॥
शिवाजी डोंगरी उंदिर । लुटारु चोर ।
करुनिया ठार । दावतो यवनांच्या दंडा ।
कापूनिया मराठयांचा तांडा । रोवितो मुस्लीमचा झेंडा ॥
अशा आनंदाच्या लहरीत । प्रताप गडी येत ।
बसता मंडपात । शिवाजी म्हणे मस्त गबर झाला ।
संपत्ती एवढी कुठून त्याला । हिर्‍या मोत्यानं मंडप सजला ।
गुडगुडी तोंडी धरुन सिदीला (बंडाला) सांगे डौलानं ॥
शिवाजीला ठार मारुन । संपत्ती नेतो लुटून ॥
मंडपात खान बैसला , कळले शिवबाला ॥
भवानीचे घेऊन दर्शन । नमून मातेला ।
जाणून काळ वेळेला । अंगभर चिलखत ल्याला ॥
भरजरी पोषाख केला । जिरे टोप शिरी चढविला ।
वाघनखे भरुनी पंजाला ॥ खानाच्या भेटीला ।
सर्जा मंडपामधें आला । आहा आहा शिवाजी पाहून ।
दुष्मनी दिली सोडून । तू दोस्त आजपासून ॥
पतंगाने झडप घालावी जशी ज्योतीला ।
सर्पाने विळखा मारावा जसा मुंगुसाला ॥
तसा खान झडपी तया समयास ।
बगलेत धरुन मानगूट, सुरा खुपसला ॥
शिवाजी शूर भोसला । तोही पुरेपुर कसलेला ।
नव्हता कच्च्या गुरुचा चेला । जिजा आईच दूध प्यायलेला ॥
तो कसचा भितोय खानाला । खानाचे कपट ओळखून ॥
मारा चुकवून । बगल तोडून झाला बाजूला ॥
मग सिंह झडपी जसा मस्त हत्तीला ।
वाघाने धरुन फाडावे जस बकर्‍याला ।
तसा शिवाजीने खानाला । वाघनखे खुपसून पोटाला ।
खानाचा फोडला कोथळा । तो खान आडवा पडला कोसळून ।
बचाव बचाव म्हणून ॥ अल्लाअल्ला म्हणून । प्राण सोडला ॥
सय्यद बंडाने जोराचा वार शिवबावर केला ॥
जिरेटोप तुटून धरणीस खेळू लागला ॥
पाहून राजावर घाला । जिवा महाला होताच बाजूला ।
तात्काळ तुटून पडला । सय्यद बंडाला धाडला खानाच्या भेटीला ॥
जयजयकार डंका गाजला । मराठयांनी हल्ला चढविला ।
रक्ताने प्रतापगड न्हाला । खानाची फौज मारुन ।
केली धूळघाण । यवन हैराण । तया समयाला ॥
खानाचे लाव लष्कर । हत्ती, घोडे स्वार । पायदळ सारं ।
लढुनिया फस्त केले यवनास । विजयाने माळ घातली शिवबास ।
शाहीर कर्डक सांगे कवनात ॥


कल्याणी कल्याणची (पोवाडा) –शाहीर रा.वं.जोशी

चाल
(मर्दानी झाशीची राणी, झाशीची राणी
तिन पालथं घालुन शान, पाजल इंग्रजा पाणी ॥ पोवाडयाची )
कल्याणचा खजीना लुटुनी, आणला आबाजींनी,
शूर सेनानी (शूर सेनानी)
अर्पिली भेट राजाला मोठया प्रेमानी ।
लावण्य अती, सुंदरी रुपाची खाणी ॥ (जी जी जी)
सुभेदार सून यावनी, पाहिली शिवबानी, निघाली वाणी (निघाली वाणी)
ही अशीच असती दिव्यरुप मम जननी ।
मी असाच सुंदर दिसतो ना शोभुनी ।
आबाजी सोनदेव यांनी, बोल ऐकूनी, मोठया शरमेनी,
खालच्या मानी (खालच्या मानी)
बोलले शिवाजी बोधरुप शब्दांनी । मानावी परस्त्री माता आणि भगिनी ॥
चाल
टकमका पाही दरबार ऐकूनी वचना ।
शिवराय सांगती आवर्जुनि सर्वांना ॥
राहू या अभय राज्यात गोरगरीबांना ।
गोब्राह्मण, अबला रक्षण आपुला बाणा ॥
हटविण्या लढाई जुलमी परकीयांना ।
गृही शिरुन झाले वैरी त्या शत्रूंना ॥
नांदवू सुखाने गरीब मुस्लीमांना ।
कळीकाळ परंतु जुलमी सरदारांना ॥
द्यावया तडाखा मोगल साम्राज्यांना ।
लुटतात प्रजेला दीन दहाडे त्यांना ॥धर्माचे नावावरती छळणार्‍यांना ।
स्वर्गात पाठवू माथेफिरु सैताना ॥
जाहला दंग दरबार ऐकुनी वचना ।
हा राजा नाही देव वाटे सर्वांना ॥
कल्याणचा अहमद मुला, म्हणे अल्ला अल्ला, ये कैसा झाला ।
तोंडातुनी काढी बोटाला, शेरान सोडल बकरीला आदमी झाला
असा प्रकार नव्हता पाहिला, अचंमित झाला, धीर वाटला सूनबाईला,
तिने सुटकेचा श्वास टाकीला--जी जी जी
अदबीन बुरखा ओढला-थरका थांबला ।
आनंद मनी झाला । नमन राजाला--प्रत्यक्ष जणू भेटला कृष्ण द्रौपदीला ॥
कल्याणी सुन खरोखर, होती सुंदर, रुप मनोहर,
मदनिका चमके जणू बिजली । राजाला भूक नाही पडली ।
मोहिनी दूर झणी सारली ॥जी जी जी॥
संयमी शिव भूपानं, मोठया प्रेमानं, केला सन्मान,
स्त्री जातीचा राखला मान, बाणा मराठयांचा पूर्ण अभिमान
उच्च आदर्श घातले छान ॥जी जी जी॥
आबाजीला सुटल फर्मान, देऊनी मान, वस्त्र भूषण, खणनारळान
ओटी भरुन करा बोळवण ॥जी जी जी॥
नीतीमान श्रेष्ठ झाला राजा, शिवाजी सजा, करावी पूजा,
दिव्य आदर्श ज्याने मांडले, मराठा ब्रीद गौरविले,
सार्‍या जगतात नाव गाजले ॥जी जी जी॥
चाल
सुभेदार मग गहिवरले तो पाहुनी सन्मान
बंदीतुनही त्याला सोडला होता राजानं
कुर्निसात मग करुन बोलला ठेवा राजे ध्यान
जन्मभर मी नाही विसरणार तुमचे अहेसान
शिवरायांनी मान डोलवुनी सांगितले शब्द
यवन तुम्ही जरी असला आमुच्या ठायी नसे भेद
परधर्माचा द्वेष नसे पण, स्वधर्माची जिद्द
जुलमीयांचे पारिपत्य करण्यासि असे सिद्ध
अत्याचार अन् अन्यायाने आम्ही होतो क्षुब्ध
महाराष्ट्राचे स्वराज्य निर्मावया कटीबद्ध
जागला मराठा आज, मराठा आज (मराठा आज) चढला नवा साज,
विजयाचे चढवू आता मस्तकी ताज
त्वेषाने बोलले छत्रपती शिवराज
कल्याणचे सुभेदाराला, निरोप एक दिला, संदेश दिला (संदेश दिला)
मेलेल्या आईचे दूध शिवाजी न प्याला ।
मावळा मराठा आज उभा राहिला--जी जी
चाल
सांगा जा बादशहाला हा निरोप आमुचा खास
हे लचके तोडायाची सोडावी आता आस
जाहली देवळे नष्ट होतात देवता भ्रष्ट
धेनू ब्राह्मण ओरडती धर्मावरती संकट
न्याय नीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट
जा, सरली तुमची सद्‌दी, द्या सांगुन आता स्पष्ट
ईंटका जवाब पथ्थरसे देण्यास जाहले सिद्ध
चालणार नाही आता अन्याय,जाहली हद्द
आमुचेच वैभव लुटुनी आमुच्याच दाती तृण
मेंढरे बनवूनी आम्हा हाकण्या निघाले कोण ?
गांजलो दडपशाहीने सारेच जाहले दीन
दारिद्रय दुःख कष्टांनी आपलाच पुरता शीण
माघार न आता घेणे हे चक्र थांबल्यावीण
दिल्लीहूनी आला कोणी सरदार जरी चालून
हा लढा न थांबण्याचा स्वातंत्र्य घेतल्यावीण
ही घौडदौड ही स्वारी त्याचीच ओळखा खूण
सुभेदार जाहला स्तब्ध, होऊन हतबुद्ध, बने निःशब्द,
डोलुनी मान-खाली वाकला, कुर्निसात करुनी राजाला,
पाहुनी वरती आभाळाला हात वर करुन काही बोलला,
खालच्या मानी घरी परतला जी-जी-जी ॥
संपला भव्य दरबार, घुमला सभोवार, जय जयकार,
राजे मग झाले घोडयावर स्वार, डोई मंदील पायी सुरवार,
शोभे हातात भवानी तरवार ॥जी-जी-जी॥
महाराष्ट्र आशेचा दीप, शोभला खूप,
श्री शिवभूप भोसले कुलभूषण की जय,
श्री शिवछत्रपती की जय, जय जय महाराष्ट्र की जय हो ॥जी-जी

कल्याणी कल्याणची (पोवाडा) –शाहीर रा.वं.जोशी

चाल
(मर्दानी झाशीची राणी, झाशीची राणी
तिन पालथं घालुन शान, पाजल इंग्रजा पाणी ॥ पोवाडयाची )
कल्याणचा खजीना लुटुनी, आणला आबाजींनी,
शूर सेनानी (शूर सेनानी)
अर्पिली भेट राजाला मोठया प्रेमानी ।
लावण्य अती, सुंदरी रुपाची खाणी ॥ (जी जी जी)
सुभेदार सून यावनी, पाहिली शिवबानी, निघाली वाणी (निघाली वाणी)
ही अशीच असती दिव्यरुप मम जननी ।
मी असाच सुंदर दिसतो ना शोभुनी ।
आबाजी सोनदेव यांनी, बोल ऐकूनी, मोठया शरमेनी,
खालच्या मानी (खालच्या मानी)
बोलले शिवाजी बोधरुप शब्दांनी । मानावी परस्त्री माता आणि भगिनी ॥
चाल
टकमका पाही दरबार ऐकूनी वचना ।
शिवराय सांगती आवर्जुनि सर्वांना ॥
राहू या अभय राज्यात गोरगरीबांना ।
गोब्राह्मण, अबला रक्षण आपुला बाणा ॥
हटविण्या लढाई जुलमी परकीयांना ।
गृही शिरुन झाले वैरी त्या शत्रूंना ॥
नांदवू सुखाने गरीब मुस्लीमांना ।
कळीकाळ परंतु जुलमी सरदारांना ॥
द्यावया तडाखा मोगल साम्राज्यांना ।
लुटतात प्रजेला दीन दहाडे त्यांना ॥धर्माचे नावावरती छळणार्‍यांना ।
स्वर्गात पाठवू माथेफिरु सैताना ॥
जाहला दंग दरबार ऐकुनी वचना ।
हा राजा नाही देव वाटे सर्वांना ॥
कल्याणचा अहमद मुला, म्हणे अल्ला अल्ला, ये कैसा झाला ।
तोंडातुनी काढी बोटाला, शेरान सोडल बकरीला आदमी झाला
असा प्रकार नव्हता पाहिला, अचंमित झाला, धीर वाटला सूनबाईला,
तिने सुटकेचा श्वास टाकीला--जी जी जी
अदबीन बुरखा ओढला-थरका थांबला ।
आनंद मनी झाला । नमन राजाला--प्रत्यक्ष जणू भेटला कृष्ण द्रौपदीला ॥
कल्याणी सुन खरोखर, होती सुंदर, रुप मनोहर,
मदनिका चमके जणू बिजली । राजाला भूक नाही पडली ।
मोहिनी दूर झणी सारली ॥जी जी जी॥
संयमी शिव भूपानं, मोठया प्रेमानं, केला सन्मान,
स्त्री जातीचा राखला मान, बाणा मराठयांचा पूर्ण अभिमान
उच्च आदर्श घातले छान ॥जी जी जी॥
आबाजीला सुटल फर्मान, देऊनी मान, वस्त्र भूषण, खणनारळान
ओटी भरुन करा बोळवण ॥जी जी जी॥
नीतीमान श्रेष्ठ झाला राजा, शिवाजी सजा, करावी पूजा,
दिव्य आदर्श ज्याने मांडले, मराठा ब्रीद गौरविले,
सार्‍या जगतात नाव गाजले ॥जी जी जी॥
चाल
सुभेदार मग गहिवरले तो पाहुनी सन्मान
बंदीतुनही त्याला सोडला होता राजानं
कुर्निसात मग करुन बोलला ठेवा राजे ध्यान
जन्मभर मी नाही विसरणार तुमचे अहेसान
शिवरायांनी मान डोलवुनी सांगितले शब्द
यवन तुम्ही जरी असला आमुच्या ठायी नसे भेद
परधर्माचा द्वेष नसे पण, स्वधर्माची जिद्द
जुलमीयांचे पारिपत्य करण्यासि असे सिद्ध
अत्याचार अन् अन्यायाने आम्ही होतो क्षुब्ध
महाराष्ट्राचे स्वराज्य निर्मावया कटीबद्ध
जागला मराठा आज, मराठा आज (मराठा आज) चढला नवा साज,
विजयाचे चढवू आता मस्तकी ताज
त्वेषाने बोलले छत्रपती शिवराज
कल्याणचे सुभेदाराला, निरोप एक दिला, संदेश दिला (संदेश दिला)
मेलेल्या आईचे दूध शिवाजी न प्याला ।
मावळा मराठा आज उभा राहिला--जी जी
चाल
सांगा जा बादशहाला हा निरोप आमुचा खास
हे लचके तोडायाची सोडावी आता आस
जाहली देवळे नष्ट होतात देवता भ्रष्ट
धेनू ब्राह्मण ओरडती धर्मावरती संकट
न्याय नीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट
जा, सरली तुमची सद्‌दी, द्या सांगुन आता स्पष्ट
ईंटका जवाब पथ्थरसे देण्यास जाहले सिद्ध
चालणार नाही आता अन्याय,जाहली हद्द
आमुचेच वैभव लुटुनी आमुच्याच दाती तृण
मेंढरे बनवूनी आम्हा हाकण्या निघाले कोण ?
गांजलो दडपशाहीने सारेच जाहले दीन
दारिद्रय दुःख कष्टांनी आपलाच पुरता शीण
माघार न आता घेणे हे चक्र थांबल्यावीण
दिल्लीहूनी आला कोणी सरदार जरी चालून
हा लढा न थांबण्याचा स्वातंत्र्य घेतल्यावीण
ही घौडदौड ही स्वारी त्याचीच ओळखा खूण
सुभेदार जाहला स्तब्ध, होऊन हतबुद्ध, बने निःशब्द,
डोलुनी मान-खाली वाकला, कुर्निसात करुनी राजाला,
पाहुनी वरती आभाळाला हात वर करुन काही बोलला,
खालच्या मानी घरी परतला जी-जी-जी ॥
संपला भव्य दरबार, घुमला सभोवार, जय जयकार,
राजे मग झाले घोडयावर स्वार, डोई मंदील पायी सुरवार,
शोभे हातात भवानी तरवार ॥जी-जी-जी॥
महाराष्ट्र आशेचा दीप, शोभला खूप,
श्री शिवभूप भोसले कुलभूषण की जय,
श्री शिवछत्रपती की जय, जय जय महाराष्ट्र की जय हो ॥जी-जी-जी॥


स्वराज्याचे तोरण (पोवाडा) –शाहीर पिराजी सरनाईक

आई जिजाई वंदन माझे तुझिया चरणाला ।
तुझ्याच पोटी वीर शिवाजी आला जन्माला ॥
होम देहाचा ज्याने केला स्वदेश कार्याला ।
असो शाहिरी मुजरा माझा श्रीशिवरायाला ॥
गद्य
(युगायुगात भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो;
त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता.)
छत्रपति शिवाजी वीर । पराक्रमी धीर ।
खरा झुंझार । हिंदी स्वराज्य स्थापाया खास ।
स्वराज्याच बांधल तोरण तोरण्यास ।
ऐका हा स्फूर्तिदायक इतिहास ॥
विजापूरचे यवन माजले । वर्चस्व आपले ।
गाजवू लागले । न्याय नाही अन्यायाचा बाजार ।
साधुसंतांची विटंबना फार । वैतागुन गेली जनता अनिवार ॥
चाल : बाणा मर्दानी
शिवरायाचे वडील शहाजी राजे समयाला । विजापूरी होते नोकरीला ॥
त्यांनी नेले विजापूरी या बाल शिवाजीला । बादशाही दरबार पहाण्याला हो ॥
चाल : कटाव
विजापुरी बाल शिवाजीला । भलभलता प्रकार दिसला ।
कोण मानीत नाही कोणाला । माणुसकी नाही माणसाला ॥
हे कळता सर्व शिवबाला । येऊन परत पुण्याला ।
हिंदवीराज्य स्थापण्याचा निश्चय केला । आई जिजाईने दिला आशिर्वाद शिवबाला ॥
विजापूरच्या यवनी सत्तेला शह देण्याला । त्यांच्या ताब्यातील घेऊन तोरणा किल्ला ॥
स्वराज्याच तोरणा बांधण्याचा मनसुबा केला ॥
मिळवणी
कानद खोर्‍यात तोरणा किल्ला । दरवाजे पाहा ।
दोहो बाजूला । एक पुण्याच्या उत्तरेला ।
बिनीदरवाजा म्हणती याला । कोकण दरवाजा पश्चिमेला ॥
सह्याद्रीच्या कडे पठारात । दर्‍याखोर्‍यांत ।
वाडया वस्त्यात । स्वराज्याच महत्व पटवून सर्वांस ।
शेकडो मावळे बाल शिवबास । येऊन मिळाले साह्य करण्यास ॥
चाल : जी जी जी
त्यांत बाजी तानाजी फिरंगोजी नरसाळा ।
एकाहुन एक मावळा घेऊन शपथेला ।
शिवाजीच्या हुकमती खाली उभा राहिला ॥
गद्य
(यावेळी उत्तरेकडे बलाढय मोगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्धी इतक्याशी मुकाबला करुन स्वराज्य स्थापणं सोपं नव्हतं पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोमरोमांत भरली होती म्हणूनच---)
कटाव
वंदन करुन भवानीला । जिंकाया तोरणा किल्ला ।
शेदोनशे मावळे संगतीला । शिवराय घेऊन चालला ।
अंधार्‍या रात्री किल्ल्याचा तळ गाठला । किल्ल्यावर चढून जाण्याला ।
मारुनीया मेखा बुरजाला । पागोटे बांधिले त्याला ।
हा हा म्हणता मावळा चढून वरती गेला । गर्जना केली हरहर महादेव बोला ॥
गद्य
(अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करुन उभा राहिला. तोच शिवाजीने किल्लेदाराला घेराव घालताच-----)
कटाव
किल्लेदार शरण आला । बिनशर्त तोरणा किल्ला ।
शिवबाच्या स्वाधीन केला । यावेळी पंधरावे वर्ष होते शिवबाला ॥
चाल : कोल्हापूरचा शाहीर
तोरणा किल्ल्यावरती पहिला बिनी दरवाज्याला ।

महाराष्ट्राचा विजयी भगवा झेंडा फडकला ॥
मिळवणी
स्वराज्याच बांधलं तोरण । तोरणा जिंकून ।
शिवाजी राजानं । सारा सह्याद्री गर्जत उठला ।
जय शिवाजी राजा आपला । शाहीर पिराजीचा मुजरा त्याला ॥



 
 


राजमाता जिजाऊ (पोवाडा) – शाहीर भगवान बाळाजी चव्हाण

धन्य धन्य जिजाऊ माता । त्यांची ही गीता ।
ऐकू जनहिता । विश्व प्रेमाची विमल मूर्ति ॥
मातृ देवता धन्य कीर्ती । पुण्यमय महाराष्ट्र धरती हां जी ॥१॥
पंधराशे अठ्ठण्णव साली । पौर्णिमा भली । पौषाची आली ।
जाधव घराण्यात धून घुमली ॥
’सिंदखेड राजा’ ग्रामी रमली । देव मंदिरे ही दुमदुमली हां जी ॥२॥
गगनास भिडे आनंद । ऐकू ये छंद । दिशाही धुंद । होवुनी गेल्या त्याच समयास ॥
शक्ति उतरली धर्म साह्यास । झाला संतोष सर्व हृदयास ॥जी॥३॥
(स्वगत : दिवसा मागून दिवस लोटले. जिजाऊ (राजकन्या) थोडया मोठया
झाल्या असतील आणि एक दिवस)
वेरुळकर मालोजी भोसले जहागीरदार
रंग पंचमी निमित्त आले जाणुनी परिवार ॥१॥सुपुत्र त्यांचे नाम शहाजी सोबत दिलदार
सहज समोरी तिथे पातली जिजाऊ सुकुमार ॥२॥
मालोजीना जाधव म्हणती बघा सून तुमची
रंग उधळुनी करते चेष्टा अपुल्या नवर्या ची ॥३॥
(आणि तोच शब्द नियतीने मालोजी राजांच्या पश्चात् खरा ठरवला.
जाधवराजांची कन्या महाराष्ट्राची राजमात होण्यासाठी बोहल्यावर चढली.)
नियतीने शब्द झेलला । खरा तो झाला ।
योगायोग आला । लग्न लागले मुहुर्तास ।
भूषण भोसले घराण्यास । पुणे प्रांतीय सूर्यवंशास ॥जी॥१॥
चालुनी सात पाऊले । भाग्य गृही आले । पुण्य उतरले ।
पाहुनी नवी सूनबाई ॥ कौतुक करती उमामाई । भेटली खरी अंबाबाई ॥२॥
घातला लग्न गोंधळ । उजळले स्थळ ।
गर्जे संबळ । स्वस्थता तरी मनी नव्हती ॥
प्रजाजन इथले हळहळती । दुष्ट येवुनी त्यांस पिडती ॥३॥
(स्वगत : असं काय घडलं होतं त्या वेळीं ?)
मंदिरे नष्ट ती झाली । व्याकुळता येथें आली ।
ना कोण कुणाचा वाली । आंदोळुन पृथ्वी गेली ।
पापी ते जाहले पुष्ट । देती ते कष्ट ।
संस्कृती नष्ट । ही जीर्ण अवस्था केली । तरु लता उन्मळून मेली ॥
चाल : १
त्या समई भयानक स्थिती । इतिहासा प्रति ।
वर्णिली इति । भूतळी कहर एक झाला ॥
सत्य सन्मार्ग तिथे हरला । पुण्य प्रेमाचा उदय विरला ॥१॥
उसळुनी क्रोध अंगात । राक्षसे घात ।
करती रस्त्यात । जगया नको जीवन करती ॥
भगिनी भ्रष्ट त्या कितीक मरती । प्रेत पाहुनी नयन भरती ॥२॥
येवुनी पूर्ण ही ग्लानी । झाली ती हानी ।डाली अवनी । काम मोहाचा आला संचार ॥
नियतीने केला होता अविचार । कळेना कुणा धर्म सुविचार ॥जी॥
(सत्य हा सर्वाचा एकच धर्म आहे याच मताच्या आऊ साहेबा होत्या. आणि म्हणून....)
आऊ साहेबा जिजा माउली खर्या् ’लोकमाता’
जन कल्याणा करीत होत्या हृदयातून चिन्ता ॥१॥
वाद तयांचा अखेर होता दुष्ट दुर्जनांसी (कारण) ?
कारण होत जगता यावे संत सज्जनांसी ॥२॥
(स्वगत : समृद्ध भारतावर परकीयांनी आक्रमण केलं,
प्रजेला लुटलं आणि त्यांची सेवा केली मात्र, आपल्याच लोकांनी.)
चाल : ४
इथे होते मराठी राजे गुलाम बनलेले । जी॥
संस्कृतीवान राष्ट्राचे तुकडे पडलेले । जी॥
शत्रूला मित्र ही होते फितूर झालेले । जी॥
स्वातंत्र्य सूर्य बुडविण्या नित्य टपलेले ॥जी॥
(स्वगत : या विकृतीच जिजाऊनी निरीक्षण केलं आणि ....)
पाहुनी ऐशी विकृती । सांगते सती ।
ऐका हो पती । अलंकार घडवा एक मजला ॥
करा स्वातंत्र्य हिन्द अबला । विनविते विनंतीने सुबला हा जी ॥१॥
ना तरी जीवन हे व्यर्थ । जळो हा स्वार्थ ।
ऐका परमार्थ । लोक हे करा संघटीत ॥
मारावी शत्रू संगे जीत । जन्म भूमिची ठेवा प्रीत ॥२॥
मी तुमची हृदय नायिका । खरी सेविका ।
गडबडू नका । प्रतिज्ञा हृदय जोडण्याची ॥
नाही कोणास मोडण्याची । सर्व बंधने तोडण्याची ॥३॥
(स्वगत : या स्वातंत्र्य संपन्न अलंकाराची मागणी करताच शहाजी राजे गडबडले---ते म्हणाले----)
चाल : ४
क्षणि सुन्न शहाजी झाले, बोलते काय ही राणी
का वेड हिला लागावे ? का स्थिती अशी दीनवाणी
काय ही सखीची प्रीत । उलट ही रीत । मारते जीत ।
हीज कसे कुणी समजावे । ही असे पूर्ण तर ज्ञानी ॥१॥
चाल १
(हिन्द भूमिवर स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी निसर्गाने अजून कुणी
शक्तिशाली पुरुष निर्माण केलाच नव्हता आणि त्यामुळे जिजाऊंच स्वप्न शहाजी
राजांकडून साकार होण्यासारखं नव्हतं. हे जिजाऊंनी जाणलं, आणि...)
घेउनी हाती तलवार । चमकती फार ।
जिजाऊ स्वार । होवूनी करु लागल्या संचार ॥
कराया दुष्टतेचा प्रतिकार । फुलविती युद्ध नीती अंगार ॥जी॥१॥
एकाग्र करुनिया मन । लाविती ध्यान ।
सोडती बाण । सामूहिक निष्ठा वाढण्याला ॥
कुलीन ललनाना रक्षिण्याला । क्रोध अन्याय मर्दिण्याला ॥हांजी॥२॥
रणचंडी सारखे रुप । पाहुनी पाप ।
भ्याले आपोआप ।:जिजाऊ म्हणती देश अमुचा ॥
धरा अभिमान थोर त्याचा । करावा पुकार स्वातंत्र्याचा ॥जी॥३॥
(स्वगत : जिजाऊ साहेबांनी युद्ध नीतीचे शिक्षण लहान वयातच जाणून घेतले.
पण त्यांना आता हवे होते मनुष्य बळ. त्यासाठी तुळजा भवानीला, अंबा
भगवतीला, काली मातेला आळवू लागल्या.)
ही पूर्ण तयारी झाली । परि बळ पाठीशी नाही
तूं धांवत अंबा बाई । संचार कराया येई
अंधार दाटला इथे । पुण्य घट रिते । जाहले जिथे ।
त्या इलाज अमुचा नाहीं । दे पाठींबा लवलाही ॥३॥
(जिजाऊंची प्रार्थना आत्मनिष्ठ होती. भगवतीने व्याकुळतेची प्रार्थना ऐकली
आणि कांही दिवसानंतर जिजाऊच्या पोटीं शिवनेरीवर हिंदवी स्थापण्यासाठीं राजे अवतरले त्यावेळीं)
धन्य तो किल्ला शिवनेरी । गजर एक करी । कल्पना खरी ।
सूर्य चमकला आज गगनात ॥ हास्य उमलले तसे भुवनात ।
सह्य हिमगिरी बोले कवनात जी ॥१॥
जागले गिरी डोंगर । देती ललकार ।
झाला अवतार । शिवाजी पुत्र थोर ठरला ॥
डाव मैदानी दुष्ट हरला । दया प्रेमाचा मार्ग धरला जी ॥२॥
भगवान बाळाजी । सुत । प्रथम भागात ।
आहे विनवीत । कृपा ही जिजामाउलीची ।
छत्रपती, संत, सज्जनांची । कल्पना महाराष्ट्र पथकाची ॥३॥

No comments:

Post a Comment

Website Security Test